Posts

कलयुगातल्या नरकासुराचा वध करायला उमाताई तू काली का झाली नाहीस?

Image
  कलयुगातल्या नरकासुराचा वध करायला उमाताई तू काली का झाली नाहीस? डॉ. अलोक पवार  स्थळ... नगर जिल्ह्यातील चिंचोडी हे गाव. गावासारखे गाव असल्याने छोटेसे गाव म्हणायला हरकत नाही. दिवाळीची सुट्टी लागणार होती. अंगणवाडी मधून लहान बालकांचे पोषण व्हावे म्हणून त्यांना सरकार तर्फे सुका शिधा देण्यात येतो. या शिधा वितरणाचे काम पूर्णपणे अंगणवाडी सेविका करतात. अंगणवाडी मध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिधा दिला जातोय का, याकडे चोख पणे लक्ष देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात. दिवाळीची सुट्टी सुरु होणार असल्याने हे काम त्वरित उरकायचे होते. कोणताही विद्यार्थी शिधेपासून वंचित राहणार नाही याची जवाबदारी होती म्हणावयास हरकत नाही. अंगणवाडी सेविका उमा पवार यांनी एका पालकांना फोन लावला की तुमच्या मुलीच्या नावाचा शिधा घेऊन जा, तिला या फोन मुळे पुढे येणारे संकटमयी भविष्य याची जरादेखील चाहूल नव्हती. उमा पवार हिला तीन व सहा वर्षांची मुले आहेत. आपल्या मुलांचे आणि एकूणच परिवाराला हात लागावा म्हणून तिने ही अंगणवाडी सेविकेची नोकरी स्वीकारली होती. साधारण शिक्षिका हा नोकरी ही सुरक्षित अशी समजली जाते. म्हणज...

चुकीची नजर : चुकीची मांडणी

चुकीची नजर : चुकीची मांडणी  डॉ. अलोक पवार  मला माहिती आहे माझे हे लेखन कदाचित बऱ्याच लोकांना न पटणारे असेल किंवा पटवून घेण्याची मानसिकता देखील कुठेतरी लांब ठेवून काही लोक माझ्या मांडणीकडे पाहतील. काही लोक विषय समजल्यावर वाचणे देखील सोडून देतील. कारण मी मुळातच माझ्या, 'युद्ध का गरजेचे आहे' या सदराच्या अंतर्गत या लेखाची मांडणी केलेली आहे. हो नुकताच एक चित्रपट प्रकाशिक झाला ' द केरळा स्टोरी ' आणि त्याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर माझे हे लिखाण आहे. खर तर हा चित्रपट जेंव्हा लेखक, निर्माते यांच्या कडून सत्य घटनेवर आधारित आहे असे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा एखादा चित्रपट निर्माता त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करतो आणि त्यावर आधारित तो चित्रपटाची मांडणी करतो आणि त्याची सुरवात मूळ चित्रपटाला काय नाव दिले जाते आहे तेथून देखील सुरवात होते. जेंव्हा चित्रपटाचे नाव आपण पाहतो आणि त्याला अनुसरून आपण चित्रपट पाहतो तेंव्हा चित्रपटाचे नाव आणि चित्रपट यांचा ताळमेळ कोठेही दिसत नाही. चित्रपटाच्या नावातील तीनही शब्द 'द', 'केरळ', 'गोष्ट' हे तीनही शब्द आपण समजावून घेऊ. जें...

जी२० चे यजमानपद भारताला

  जी२० चे यजमान पद भारताला डॉ. अलोक पवार जर कोणी एखादा व्यक्ती आर्थिक मंदित अडकला तो डुबतो आहे तर तो स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतो. तो पुरेपूर हातपाय हलवतो. आणि या सर्व गोष्टीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. हे करित असताना तो नानापरीने प्रयत्न करतो आणि पुन्हा कसा बाहेर येईल याच्यासाठीची त्याची धडपड ही वाखारण्या जोगी असते. आता तो व्यक्ती जेंव्हा दुसरीकडे मदतीसाठी हात पसरतो तेंव्हा जर तो म्हणाला बाबा मलाच थोडी मदत कर तर परिस्थिती थोडी नाजूक असते.  बर ही जी परिस्थिती आहे ती एक दोघांची नसून संपूर्ण देशाची आहे असे म्हणले तर आणखीन मरगळ येते. यापुढे हिच परिस्थिती बाजूच्या देशांची आहे असे म्हणालो तर मेल्याहून मेल्यासारखे होईल. हो ही गोष्ट आहे जागतिक मंदीची. संपूर्ण जगातील काही ठराविक देश सोडले तर संपूर्ण जग जेंव्हा जागतिक मंदीच्या झळा सहन करित असते तेंव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते. तेंव्हा प्रत्येक देशाने संयमाने त्या गोष्टीवर विचार करून विविध मार्ग काढणे हा उत्तम पर्याय असतो. १९९७ साली परिस्थिती अतिशय नाजूक होती. त्यावर खबरदारी म्हणून १९९९ मध्ये परराष्ट्रमंत्री यांच्या मार्गदर्शना...

महादेव कोळी समाज : हिंदूंपासून दूर पाठवता का

Image
  महादेव कोळी समाज : हिंदूंपासून दूर पाठवता का? डॉ. अलोक पवार नांदेड च्या रस्त्यावर एक मुलगी येते, तिच्या हातात भगवान शंकर आणि पार्वती चा फोटो असतो. तिच नाव मयुरी पुंजरवाड. अचानक तिच्या मागे काही समुदाय येतो. त्यातही काहींच्या हातात शंकर पार्वती यांचे फोटो, काहींच्या हातात पिवळे झेंडे आणि काहींच्या हातात निळे झेंडे. हा जन आक्रोश होता तहसील कार्यालयाबाहेरचा. कारण होते मयुरीला तिच्या उच्च शिक्षणासाठी तिच्या जातीच्या दाखल्याची वैधता वाढवून घ्यायची होती.  मयुरी मूळची महादेव कोळी समाजाची. तिच्या दाखल्याची वैधता तहसीलदार कार्यालयाने नाकारली आणि सोबत तिला हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही तर देवाची पूजा करता. मग तुम्ही कसले आदिवासी. तुम्हाला हिंदू का म्हणू नये. मयुरी सोबतच्या सर्व समूहाने नांदेड मधील आय.टी. आय. चौकात आपल्या घरातील देवांच्या फोटोसह आंदोलन केले की आम्हाला हे देव ही नकोत आणि हिंदूंच्या त्यांच्या धर्माच्या पद्धती देखील नकोत. आता आपण हे प्रकरण नक्की कसे आहे. कोण बरोबर कोण चुक ते समजावून घेण्याचा प्रयत्न करू.  महादेव कोळी म्हणजे अनुसूचित जमाती ज्याला इंग्रजी मध्ये Sche...

भिडे वाड्याची गोष्ट

 भिडे वाड्याची गोष्ट डॉ. अलोक पवार बाई तुझ आयुष्य म्हणजे 'चुल आणि मूल'. म्हणजे लग्न झाल्यावर एक फुकणी घेऊन तुला निखारा पेटवायचा आहे. चुलीतून जो धुर निघतो आहे, तो नाका डोळ्यातून जाऊनही तुला सुगरण बनायचे आहे. आणि हो त्याच सोबत तुला घरातील मुलांना देखील सांभाळायचे आहे. त्यांना देखील मोठ वाढवायचे आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचे नाही. एकंदरीतच तुला घराला घरपण आणायचे आहे. घराच्या चार भिंती एवढंच तुझ आयुष्य. आता थोडा विचार केला तर मुलांवर संस्कार देण्याची जवाबदारी स्त्रीवर दिली आहे मात्र स्त्रीला मुळात संस्कार म्हणजे नक्की काय आहेत हे कळले आहे का? का संस्कार म्हणून ती देखील पूर्वापार चालत आलेल्या गोष्टीच पुढच्या पिढीला शिकवते आहे. मग भले त्या गोष्टी चांगल्या संस्कारक्षम असो वा नसो. आता ही गोष्ट म्हणजे स्त्री शिकली पाहिजे या गोष्टीला हेरली ती म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले यांनी. 

भगवतगीता : अध्याय १

Image
  भगवतगीता : अध्याय १ अर्जुनविषादयोग  अर्जुनाच्या डोक्यात पडलेले विचार डॉ. अलोक पवार गीता वाचायला घेतली तर ती संपूर्ण पणे संस्कृत मध्ये आहे. त्यामधील संस्कृत जरी वाचले तरी सध्या माझ्या डोक्यावरून जाऊ शकते म्हणून त्या गीतेचे वाचन करताना तिला संस्कृत - मराठी असे समाजवून घेणे गरजेचे असते. हे सर्व करताना मी सुरवातीला गीतेमधील पहिला अध्याय म्हणजे अर्जुनविषादयोग वाचायला घेतला. यामध्ये एकूण ४७ श्लोक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात ध्रुतराष्ट्र आणि संजय यांच्यामधील चर्चा वर्णन केली आहे. ध्रुतराष्ट्र आंधळा असल्यामुळे संजय हा त्याला कौरव आणि पांडव यांच्या मधील युद्ध कसे होते आहे, एकदंरीत याची कॉमेंट्री सांगतो आहे. आणि एकदंरीत त्या दोघांमधील संवाद हा पहिला अध्याय आहे असे वाटू लागतो. मग कौरव कसे उभे आहेत, पांडव कसे उभे आहेत, त्यांचे सैन्य कसे आहे, युद्धाची सुरवात कशी होणार, कोणी शंखनाद केला याची इत्यंभूत माहिती आपल्याला इथे या अध्यायात समजते. जर आपण याचं अध्यायात पुढे वाचन केले तर ही कथा वाढत जाते. संजय ध्रुतराष्ट्राला युद्धस्थळी आणखीन काय काय होते आहे याची खबर देतात. बघायला गेलो तर कौर...

अभिनंदन... मोदींच्या तर्फे देशाला स्वदेशी विमाने

Image
  अभिनंदन ... मोदींच्या तर्फे देशाला स्वदेशी विमाने डॉ. अलोक पवार सगळ्या न्यूज चॅनेल्स वर सध्या बातम्या बघितल्या. अखेर टाटा एअरबस ही विमान बनविणारी कंपनी गुजरातमधील बडोदा या ठिकाणी थाटली जाणार. जाणार म्हणजे अगदी निश्चितपणे कारण भले ही आपल्याला सत्यनारायण पूजेच आमंत्रण नसेल तरीही ३० ऑक्टोबर २०२२ ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाटा एअरबस, बडोदा, गुजरात या ठिकाणी कोनशिला पूजन म्हणजेच पायाभरणीचा कार्यक्रम आहे.  आता आपल्याला आमंत्रण नसेल तरी नाराज होऊ नका. कारण कदाचित आपल्याला पुढे जाऊन न्यूज चॅनेल्स किंवा वर्तमानपत्रमध्ये पंतप्रधान यांच्या या कार्यक्रमाचे फोटो नक्कीच बघायला भेटतील. आपले पंतप्रधान फोटो काढण्यासाठी ते जगाच्या काना कोपऱ्यात जाण्यासाठी तत्पर असतात हे आपल्याला नवखे नाही. त्यामुळे काळजी करणाचे कारण नाही. काळजी सोडून आपण हा प्रकल्प नक्की काय आहे हे समजवून घेऊ. भारताची लष्करी सेवा यामध्ये मोठी सुधारणा होत आहे. २०२१ मध्ये आपण स्पेन कडून ५६ सी २९५ एम. डब्लू . ही वाहतूक करणारी विमाने मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस.ए. या कंपनीकडून विकत घेतली. बघा हे किती छा...