Posts

Showing posts from December, 2022

भिडे वाड्याची गोष्ट

 भिडे वाड्याची गोष्ट डॉ. अलोक पवार बाई तुझ आयुष्य म्हणजे 'चुल आणि मूल'. म्हणजे लग्न झाल्यावर एक फुकणी घेऊन तुला निखारा पेटवायचा आहे. चुलीतून जो धुर निघतो आहे, तो नाका डोळ्यातून जाऊनही तुला सुगरण बनायचे आहे. आणि हो त्याच सोबत तुला घरातील मुलांना देखील सांभाळायचे आहे. त्यांना देखील मोठ वाढवायचे आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचे नाही. एकंदरीतच तुला घराला घरपण आणायचे आहे. घराच्या चार भिंती एवढंच तुझ आयुष्य. आता थोडा विचार केला तर मुलांवर संस्कार देण्याची जवाबदारी स्त्रीवर दिली आहे मात्र स्त्रीला मुळात संस्कार म्हणजे नक्की काय आहेत हे कळले आहे का? का संस्कार म्हणून ती देखील पूर्वापार चालत आलेल्या गोष्टीच पुढच्या पिढीला शिकवते आहे. मग भले त्या गोष्टी चांगल्या संस्कारक्षम असो वा नसो. आता ही गोष्ट म्हणजे स्त्री शिकली पाहिजे या गोष्टीला हेरली ती म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले यांनी. 

भगवतगीता : अध्याय १

Image
  भगवतगीता : अध्याय १ अर्जुनविषादयोग  अर्जुनाच्या डोक्यात पडलेले विचार डॉ. अलोक पवार गीता वाचायला घेतली तर ती संपूर्ण पणे संस्कृत मध्ये आहे. त्यामधील संस्कृत जरी वाचले तरी सध्या माझ्या डोक्यावरून जाऊ शकते म्हणून त्या गीतेचे वाचन करताना तिला संस्कृत - मराठी असे समाजवून घेणे गरजेचे असते. हे सर्व करताना मी सुरवातीला गीतेमधील पहिला अध्याय म्हणजे अर्जुनविषादयोग वाचायला घेतला. यामध्ये एकूण ४७ श्लोक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात ध्रुतराष्ट्र आणि संजय यांच्यामधील चर्चा वर्णन केली आहे. ध्रुतराष्ट्र आंधळा असल्यामुळे संजय हा त्याला कौरव आणि पांडव यांच्या मधील युद्ध कसे होते आहे, एकदंरीत याची कॉमेंट्री सांगतो आहे. आणि एकदंरीत त्या दोघांमधील संवाद हा पहिला अध्याय आहे असे वाटू लागतो. मग कौरव कसे उभे आहेत, पांडव कसे उभे आहेत, त्यांचे सैन्य कसे आहे, युद्धाची सुरवात कशी होणार, कोणी शंखनाद केला याची इत्यंभूत माहिती आपल्याला इथे या अध्यायात समजते. जर आपण याचं अध्यायात पुढे वाचन केले तर ही कथा वाढत जाते. संजय ध्रुतराष्ट्राला युद्धस्थळी आणखीन काय काय होते आहे याची खबर देतात. बघायला गेलो तर कौर...