भिडे वाड्याची गोष्ट
भिडे वाड्याची गोष्ट डॉ. अलोक पवार बाई तुझ आयुष्य म्हणजे 'चुल आणि मूल'. म्हणजे लग्न झाल्यावर एक फुकणी घेऊन तुला निखारा पेटवायचा आहे. चुलीतून जो धुर निघतो आहे, तो नाका डोळ्यातून जाऊनही तुला सुगरण बनायचे आहे. आणि हो त्याच सोबत तुला घरातील मुलांना देखील सांभाळायचे आहे. त्यांना देखील मोठ वाढवायचे आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचे नाही. एकंदरीतच तुला घराला घरपण आणायचे आहे. घराच्या चार भिंती एवढंच तुझ आयुष्य. आता थोडा विचार केला तर मुलांवर संस्कार देण्याची जवाबदारी स्त्रीवर दिली आहे मात्र स्त्रीला मुळात संस्कार म्हणजे नक्की काय आहेत हे कळले आहे का? का संस्कार म्हणून ती देखील पूर्वापार चालत आलेल्या गोष्टीच पुढच्या पिढीला शिकवते आहे. मग भले त्या गोष्टी चांगल्या संस्कारक्षम असो वा नसो. आता ही गोष्ट म्हणजे स्त्री शिकली पाहिजे या गोष्टीला हेरली ती म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले यांनी.